Saturday, March 27, 2021

वेळ दवडणाऱ्या सवयी टाळा


यशस्वी लोकांच्या जीवनी वाचल्या आणि त्यांचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की, यशाच्या शिखरावर पोहचलेल्या लोकांमध्ये काही गोष्टी समान किंवा सवयी समान असतात. आपण आपल्या जीवनात या गोष्टींचा किंवा सवयींचा अंतर्भाव केल्यास तुम्हीही वेगाने प्रगती करू शकता. प्रत्येक दिवसांचा जास्तीत जास्त वेळ कसा सत्कारणी लावावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

वेळ वाया घालवणाऱ्या सवयी टाळा- तुम्हाला जर यशस्वी व्यक्ती बनायचं असेल तर दिवसातील मोठा हिस्सा असलेल्या वेळ वाया घालवणाऱ्या सवयींचा शोध घ्यावा. या सवयींचा तपास लागल्यावर तुम्ही तुमच्या आयुष्याला पुढे जायला ब्रेक लावणाऱ्या या सवयींवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करा. पण याची सुरुवात आतापासूनच करा. वेळ दवडू नका. कोणतीही गोष्ट उद्यावर ढकलू नका. प्रयत्नांच्या बळावर मोठ्यात मोठ्या अडचणींवर मात करता येऊ शकते. सततच्या प्रयत्नाने तुमच्या चुकीच्या सवयी हळूहळू कमी होत जातील आणि तुमची  यशाच्या दिशेने जाणारी वाटचाल  वेग घेईल.

चांगल्यांची संगत धरा-तुम्ही जीवनात यशस्वी होण्याचं ठाणलं असेल आणि यशाच्या एका मुक्कामावर पोहोचायचं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर संगतीचा विचार करावा लागेल. तुमचे विचार कोणाकोणाशी अधिक शेअर करता , तुमचा सर्वाधिक वेळ कोणा कोणासोबत घालवता यावर तुमची विचारसरणी आणि व्यवहार अवलंबून असतात. समजा- तुम्ही तुमचा प्रत्येक दिवस अशा लोकांसोबत घालवता ,ज्यांचे विचार छोटे आहेत आणि जे मोठी स्वप्ने पाहायला घाबरतात किंवा ज्यांना जिकडे पाहावे तिकडे नकारात्मकता दिसते.अशांच्या संगतीने तुम्ही कधीच यश मिळवू शकत नाही. कारण त्यांच्या संगतीचा परिणाम तुमच्या विचारावरही पडतो. त्यामुळे जितके लवकर होता होईल तेवढे लवकर अशा नकारात्मक विचारांच्या लोकांची संगत सोडून सकारात्मक विचार बाळगणाऱ्या लोकांच्या मेळ्यात जा. त्यांच्या सोबत उठ-बस ठेवा. याखेरीज तुमच्या स्वप्नांवर आणि विचारांवर हसणाऱ्या लोकांपासून दूर राहा.

कामाची टाळाटाळ करू नका- आपल्या संगळ्यांनाच आजचे काम उद्यावर टाकायचे नसते,याची कल्पना आहे. तरीही आपल्यातील कित्येक लोक काम वेळेत पूर्ण करत नाहीत. पण काम उद्यावर टाकल्याने कामांचा बोझा वाढत जातो. आजचे काम आजच पूर्ण करायला हवे. टाळाटाळ केल्याने तुम्ही स्वतःला धोका तर देताच, पण टाळलेले काम कधी ना कधी पूर्ण करावे लागतेच,त्यामुळे त्या कामांचे प्रेशर तुमच्यावर वाढत जाते. मानसिक दबाव वाढत जातो आणि घाईघाईत काम करताना असंख्य चुका होतात व तुमचे वरिष्ठांवर बॅड इम्प्रेशन पडते. त्यामुळे आजचे काम आजच करण्याला प्राधान्य द्या. यश मिळवताना कामावर ठेवलेली निष्ठा आणि मेहनत महत्त्वाची आहे.वेळ दवडणाऱ्या गोष्टी टाळल्यास तुमचे भविष्य 'सुवर्णमय' होणार आहे हे निश्चित!-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Thursday, March 11, 2021

जे लोक नेहमी आनंदी असतात त्यांना काही खास सवयी असतात


जगात असे बरेच लोक आहेत जे तणावमुक्त राहून प्रत्येक परिस्थितीत आनंदाने जगतात.  आयुष्यात सुख आणि दु: ख येते, परंतु जे लोक नेहमी आनंदी असतात ते सहसा व्यर्थ गोष्टीची चिंता करत नाहीत आणि हसत हसत जीवन जगत असतात आणि आनंदी राहतात.  वास्तविक, या लोकांना काही सवयी आहेत ज्या त्यांना प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक ठेवतात आणि तणावग्रस्त परिस्थितीतही त्यांचा ताण येत नाही.

चांगले शोधतात, वाईट नाही: साहजिकच माणसाचा कल नकारात्मक गोष्टींकडे अधिक असतो.  बहुतेक लोक इतरांच्या उणीवाकडे अधिक लक्ष देतात आणि चांगल्कययाडे कमी.  त्याच वेळी, नेहमी आनंदी लोक प्रत्येक परिस्थितीत चांगल्या आणि चांगल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतात.  या लोकांना असा विश्वास आहे की जे घडते ते चांगल्यासाठी आहे.  त्यामुळे ते बहुतेक आनंदी असतात.

माफ करणं जाणतात: जे लोक नेहमी आनंदी असतात.  इतरांसह स्वतःला कसे क्षमा करावे हे त्यांना माहित आहे. ते लोक छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेत नसतात. ते लोक माफी मागण्यातही कंजूषी करत नाहीत.  जर त्यांनी कधीही चूक केली तर ते स्वत: दिलगीरी व्यक्त करतात. यामुळे त्यांच्या हृदयातून चुका करण्याचं ओझं कमी होते आणि ते आनंदी राहतात.

मनापासून काम करतात : लोकांना नेहमी आनंदी ठेवण्याचे गुण म्हणजे ते त्यांचे कार्य मनापासून करतात.  कधीकधी त्यांना अशा गोष्टी कराव्या लागतात जे त्यांच्या आवडीच्या नाहीत.  तरीही, ते कामापासून चोरी करीत नाहीत आणि परिश्रमपूर्वक काम करतात आणि आनंदित असतात.

आपले काम मोठ्या उद्देशाशी जोडून पाहतात: जे लोक नेहमी आनंदी असतात ते आपले काम मोठ्या उद्देशाला जोडून पाहतात.  काही मजूर मंदिराच्या बांधकामात मजुरी करत असतात.  एका मजुराचं म्हणणं होतं की, होता की तो भिंत बांधत आहे.  दुसर्‍याचं म्हणणं होतं की, तो विटा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेत होता.  त्याचवेळी तिसर्‍या कामगाराने सांगितले की तो मंदिर बांधणीत आपले श्रम दान करीत आहे.  आता तुमच्या लक्षात येईल की कोण आनंदी आहे. या तीन मजुरांपैकी सर्वात आनंदी तिसरा मजूर असेल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली