Thursday, August 31, 2023

(करिअरवाटा) अर्थतज्ज्ञ बना आणि जगणे 'अर्थपूर्ण' करा

कला, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये अर्थशास्त्र अवघड असल्याचा गैरसमज असतो. मात्र, हा विषय सोपा असून मानवी जीवनात अर्थशास्त्राला खूप महत्त्व आहे. अर्थशास्त्रात मानवांचे जगणे, जीवन समृद्ध व आनंददायी करण्याची क्षमता आहे. अर्थशास्त्ररूपी मित्र जगण्याला अर्थ पूर्ण करू शकतो. अर्थशास्त्रातील पदवी, पदव्युत्तर शिक्षण तसेच सेटनेट, पीएच.डी. केल्यास उत्तुंग यश मिळवता येते. 

अलीकडे त्यातही कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक व राष्ट्रीय पातळीवर अर्थकारण कोलमडत असताना ते सावरण्याची ताकद अर्थशास्त्रामध्येच आहे. शासन पातळीवर कररचना व कर आकारणी करण्यासाठी अर्थशास्त्रीय ज्ञानाची नितांत गरज आहे अन्यथा सरकार नावाच्या यंत्रणेला अपयश येते. देशांतर्गत भाववाढीची, महागाईची समस्या निर्माण होते यासाठी शासनाला जबाबदार धरले जाते. शेतीशी संबंधित प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी कृषी अर्थशास्त्र अभ्यासकांची गरज सातत्याने भासते. 

कशाचा अभ्यास कराल? - अर्थशास्त्रातील मुख्य दोन अभ्यास शाखा आहेत. ९. सूक्ष्म अर्थशास्त्र (Micro Economics) आणि २. समग्र अथवा स्थूल अर्थशास्त्र (Macro Economics) , व्यक्‍तिगत पातळीवरील खर्च, उत्पन्न, बचत, गुंतवणूक, उपभोग याद्वारे मागणी पुरवठ्यातील बदल याच्याशी सबंधित अर्थविषयक समस्याचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्भ्यासविषय आहे. तर राष्ट्रीय सकल उत्पन्न, उत्पादन, व्यापार, व्याजदर, चलनवाढ, भाववाढ, आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंध यांच्याशी संबंधित घटक स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात.

व्यक्‍तीच्या, कुटुंबाच्या, उद्योग-व्यवसाय संस्था आणि देशाच्या दष्टीने दोन्ही शाखाचा अभ्यास हा तितकाच महत्त्वाचा आहे. पदवी आणि पदव्युत्तर पदवी स्तरावर आपण योग्य विषयाची विशेष विषय म्हणून निवड केली पाहिजे. अर्थशास्त्र, कृषी वित्त पुरवठा, सहकार, विकास व नियोजनाचे अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, आयात-निर्यात व्यापार, उपयोजित अर्थशास्त्र, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे अर्थशास्त्र, श्रम-श्रमिकांचे अर्थशास्त्र, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र, गुंतवणुकीचे अर्थशास्त्र, सार्वजनिक अर्थशास्त्र, इकॉनोमीट्रिक्स, सांख्यिकी अर्थशास्त्र, या आणि अशा काही महत्त्वाच्या शाखांसोबत जवळपास पंचवीस विषयशाखांचा अभ्यास करता येतो, समभाग बाजार, भांडवल बाजार, नाणेबाजार, बॅकिंग,  शासकीय धोरणे व निर्णय,  आर्थिक संक्रमणावस्था, वित्तीय विश्लेषण, धोरण विश्लेषक आदीं विषयांमध्ये प्रावीण्य संपादत करून  यशस्वी करिअर घडविता येते. 

कोणत्या क्षेत्रात मिळतील संधी? अर्थशास्त्रात पदवी, पदव्युत्तर पदवी, नेट - सेट, पीएच.डी. करून महाविद्यालयात, विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचा अध्यापक - संशोधक म्हणून नोकरी करता येते. 

बॅंकांमध्ये नोकरीची संधी - सेबी, इंडियन बँक असोसिएशन, नॅशनल हाउसिंग बोर्ड, आयात-निर्यात बँक, सहकारी बँकात नोकरीच्या उत्तम संधी मिळतात, अर्थशास्त्रासोबत विधी, व्यवस्थापन, पर्यावरण, उत्पादन, वित्तीय संबंध यातील पदवी असेल तर ते पूरक ठरते. 

अर्थतज्ज्ञांची बाजारपेठांना गरज- अर्थशास्त्रातील संशोधन जागतिक पातळीवर दखलपूर्ण ठरते. जगभरातील कॉपोरेट हाउसेसमध्ये त्यांचे उत्पादन, विक्री, नफा, सामाजिक दायित्व, कामगारांचे प्रश्‍न, बाजारातील चढ-उतार यांचे विश्लेषण करण्यासाठी अर्थशास्त्राचे उत्तम ज्ञान असणारे विश्लेषक हवे असतात. 

आयएफएस, रिझर्व्ह बँक, जागतिक बॅकेत करिअर - शासनाच्या ध्येयधोरणाच्या निश्चितीमध्ये आपला सहभाग असावा, तसेच सरकारी, उत्तम पगार आणि मानसन्मानाची नोकरी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना  IFS (Indian Economic Services) या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नशीब अजमावता येते. 

 अर्थशास्त्र, सांख्यिकी अर्थशास्त्र, इकॉनोमॅट्रिक्स, संशोधनाची आवड असणार्‍यांसाठी भारतीय रिझर्व्ह बॅकेत विद्यार्थीदशेपासूनच संधी आहेत, पदव्युत्तर पदवी करताना आरबीआयची 'यंगस्कॉलर'ची स्पर्धा परीक्षा देऊन धेट रिझर्व्ह बॅकेच्या सेवेत पहिल्या टप्प्यावर दाखल होण्याची सधी असते, याशिवाय आरबीआयच्या द्वितीय श्रेणीतील नोकरीच्याही संधी खास अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यासाठी असतात. याशिवाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, पुननिर्माण आणि विकासासाठीची आंतरराष्ट्रीय बँक (जागतिक बॅक) यांच्याही सेवा क्षेत्रात जाण्याच्या संधी अर्थशास्त्राची जागतिक आर्थिक प्रश्नांची आंतरराष्ट्रीय सबंधीची जाण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असते. 

अर्थशास्त्र शिक्षणासाठी सुप्रसिद्ध संस्था-

● टाटा समाज विज्ञान संस्था, चेबूर, मुंबई ●मुंबई स्कूल ऑफ इकॉर्नोमिक्स , मुंबई विद्यापीठ ● जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली ● दिल्ली स्कूल ऑफ इकॉर्नोमिक्स, दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली ● मद्रास ऑफ इकॉर्नोमिक्स , मद्रास ● इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च, मुंबई ● इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, ● बनारस हिंदू विद्यापीठ ● शांतिनिकेतन, कोलकाता ● सरदार पटेल श्रम विज्ञान संस्था ● कृषी संशोधन व विकास संस्था, बंगळुरु ● जागतिक पातळीवरही ऑक्सफर्ड, केंब्रिज, कोलंबिया, लंडन स्कूल ऑफ इकॉर्नोमिक्स

विधी क्षेत्रातही मिळेल यश 

आज आपल्याभोवती गुव्हेगारीही वाढलेली दिसते. यासाठी विधी पदवी व अर्थशास्त्र सोबतीने केल्यास आर्थिक खटले उत्तम प्रकारे चालवता येऊ शकतात.




Thursday, August 24, 2023

प्राणिशास्त्र पदवीधर व्हा आणि संशोधन, उद्योगमध्ये करिअर करा

प्राणिशास्त्र हे केवळ प्राण्यांशी मर्यादित शास्त्र नसून त्याची व्यापकता मोठी आहे. प्राणिशास्त्राअंतर्गत सिस्टेमॅटिक्स, वर्गीकरण, मानव आणि प्राणी शरीरविज्ञान, वैद्यकीय प्राणिशास्त्र, परजीवीशास्त्र, कीटकशास्त्र, हिस्टोलॉजी, उत्क्रांती, सेल-बायोलॉजी, अनुवंश शास्त्र, आण्विक जीवशास्त्र, टॉक्सिकोलॉजी, इकोलॉजी, पर्यावरण विज्ञान, इम्युनोलॉजी, भ्रूणशास्त्र, जैवतंत्रज्ञान असे हे अफाट क्षेत्र आहे. 

प्राणीशास्त्राच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर करिअरच्या असंख्य संधी आहेत. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवार एकतर उच्च शिक्षण घेऊ शकतात किंवा ते नोकरी शोधू शकतात. बीएस्सीमध्ये पदवीधरांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे अनेक पर्याय आहेत. या विद्यार्थ्यांना भारतासह परदेशात अनेक संस्थांमध्ये मागणी वाढत आहे. 

या विषयांत घेता येईल पदव्युत्तर-पदवी -प्राणीशास्त्र विषयात पदवी उत्तीर्ण झालेल्यांना प्राणीशास्त्र, मानवशास्त्र, जैवविविधता, बायोडन्फॉरमॅटिक्स, सागरी जीवशास्त्र, आहारशास्त्र आणि पोषण विज्ञान, सार्वजतिक आरोग्य, पर्यावरण शास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, अप्लाइट प्राणीशास्त्र, बायोकेमिस्ट्री, फोरेत्सिक सायन्स, रेशीम शास्त्र, मत्स्यव्यवसाय, होम सायन्स, विषाणूशास्त्र, मानसशास्त्र, मास्टर ऑफ सायत्स, पॅरामेडिकल, व्यवसाय प्रशासन, क्लिनिकल सायकोलॉजी, भूणशास्त्र या विषयांत मास्ट ऑफ सायन्स ही पदव्युत्तर पदवी घेता येते. 

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेससाठी उपयुक्त - उपयुक्‍त बीएस्सी प्राणीशास्त्र विज्ञान विद्यार्थ्यांना इंडियन फॉरेस्ट सव्हिसेस परीक्षेत उत्तीर्ण होऊन फॉरेस्ट ऑफिसरपदी नोकरी मिळविता येते. त्यासह एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षेसाठी हा विषय उपयुक्‍त ठरतो. 

नोकरीच्या  विविध संधी- पर्यावरणशास्त्र, पर्यावरण सल्लागार, निसर्ग संवर्धन अधिकारी, पर्यावरण शिक्षण अधिकारी, पर्यावरण व्यवस्थापक, संशोधन शास्त्रज्ञ (जीवन विज्ञान), जैववैद्यकीय शास्त्रज्ञ, प्राणिसंग्रहालय Arex, सागरी जीवशास्त्रज्ञ, प्राणी आणि वन्यजीव शिक्षक, प्राणिसंग्रहालय किपर , फॉरेन्सिक asst, Embryologist (IVF-Test tube baby technologist), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तांत्रिक सहायक, क्लिनिकल डॉक्युमेंटेशन सेवा, वैज्ञानिक लेखक, विज्ञान पत्रकार होता येते. 

शिंक्षक, प्राध्यापक होऊन करा अध्यापन- पदव्यूत्तर पदवी घेतल्यातंतर नेट, सेट आणि पीएच.डी. करता येते. शाळा किंवा विज्ञान शाखेची कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षक आणि प्राध्यापक म्हणून काम करता येते. यासह संशौधन आणि विकास संस्थांसाठी प्राणीशास्त्रज्ञ / फ्री-लान्स सल्लागार म्हणूनही काम करता 

वन्यजीव, जीवशास्त्र, पर्यावरणीय शास्त्रांत करा संशोधन 

1. पर्यावरण शिंक्षण केंद्र 

२. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमॅट 

3. वन्यजीव संरक्षण संस्था, बंगलोर 

४. इंडियन डन्स्टिल्यूट ऑफ सायन्स, बंरातोर 

5. भारतीय वन्यजींव संस्था, डेहरादून 

6. जवाहरलाल नेहरु विद्यापीठ 

७. भारतीय पर्यावरण आणि पर्यावरण संस्था 

८. जवाहरलाल नेहरु प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्र, बंगलोर 

शासकीय विंभाग, संस्थांसोबत करा काम 

● पर्यावरण आणि वन मंत्रालयाची प्रादेशिक संसाधन केंद्र

● वाइल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया

● डॉ. सलीम अली स्कूल ऑफ इकोलॉजी 

● इंडियन टायगर वेलफेअर सोसायटी 

●वाइल्डलाड्रफ ट्रस्ट ऑफ इंडिया 

●केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण ( सीझेडए) 

●झू आउटरीच संस्था 

●वन्यजीव माहिती संपर्क विकास 

● बॉम्बे नेंचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) 

● विज्ञान आणि पर्यावरण केंद्र (सीएसइ) 

● अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च  इकोलॉजी अँड पर्यावरण (एटीआरर्ईई) 

पदवी घेतल्यानंतर व्हा उद्योजक -पदवीधरांना रेशीम उद्योग, मत्स्यपात्नन, मधमाशी पालन, डेअरी उद्योग, गांडूळ खत उद्योग, पॅथॉलॉजी लॅब, Tissue culture lab, पाणी व माती परीक्षण प्रशोगशाळा यामध्ये स्वत:चा उद्योग  सुरू करता येऊ शकतो. 




Friday, August 11, 2023

फौजदार व्हायचंय ? तर असा करा अभ्यास!

पोलिस उपनिरीक्षक हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरले जाते. ही परीक्षा घेण्यासाठी संविधानानुसार स्थापन झालेली घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे अत्यंत पारदर्शक स्वरूपात परीक्षा घेतली जाते. जर विद्यार्थ्याचे ध्येय निश्चित असेल, प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असेल तर यश नक्की मिळते. दरवर्षी लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट 'ब' या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होते. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक, राज्यकर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी व दुय्यम निबंधक अशी विविध पदे भरली जातात. 

परीक्षेचे स्वरूप: ही परीक्षा वस्तुतिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून चार टप्प्यामध्ये घेतली जाते.

 १) पूर्व परीक्षा - १०० गुण 

२) मुख्य परीक्षा - ४०० गुण 

३) शारीरिक चाचणी - ७० गुण (गुणात्मक स्वरूप) 

४) मुलाखत - ४० गुण 

शैक्षणिक, शारीरिक पात्रता पीएसआय- पदासाठी सर्वसाधारण कोणत्याही विषयात पदवी धारण केलेला उमेदवार अर्ज करू शकतो.  पुरुष उमेदवारांसाठी १६५ से.मी. उंची व महिलांसाठी १५७ से.मी. उंची आवश्यक आहे. 

1.पूर्व परीक्षा - पूर्व परीक्षा चाळणी स्वरूपाची असते, त्यामध्ये 100 प्रश्न हे १०० गुणांसाठी असतात. या परीक्षेसाठी साधारणत: २ ते 3 लाख विद्यार्थी अर्ज करतात. यातून चाळणी करून (एकूण जागा x १२) हे प्रमाण लक्षात घेऊन एक कट ऑफ रेषा आखली जाते व त्या रेषेवरील विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देण्यासाठी पात्र केले जाते, पूर्व परीक्षेला 100 प्रश्‍न येतात व यासाठी वेळ असतो केवळ एक तास यामुळे परीक्षा देते वेळी अचूकतेबरोबर वेळेत प्रश्‍न सोडवणे महत्त्वाचे असते. पूर्वपरीक्षेनंतर जवळपास ४ महिन्यांत मुख्य परीक्षा घेतली जाते. पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम - राज्यशास्त्र - १५ प्रश्‍न, अर्थशास्त्र - 15 प्रश्न, चालू घडामोडी - १५ प्रश्न, सामात्य विज्ञान - 15 प्रश्न, इतिहास - १० प्रश्‍न, भूगोल - १० प्रश्न, गणित व बुद्धिमत्ता - २० प्रश्‍न 

2 मुख्य परीक्षा : मुख्य परीक्षासुद्धा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते. त्यामध्ये २ पेपर असतात व प्रत्येक पेपरसाठी वेळ 1 तास असतो.  पेपर क्रमांक १- यामध्ये २०० गुणांसाठी मराठी व्याकरणावर ५० प्रश्‍न व इंग्रजी व्याकरणावर ५० असे १०० प्रश्‍न असतात.  पेपर क्रमांक २ - या पेपरमध्ये जवळपास ७० टक्‍के अभ्यासक्रम हा पूर्वपरीक्षेचाच असतो फक्त पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, माहितीचा अधिकार कायदा, लोकसेवा हक्‍क अधिनियम व सुदूर संवेदन हे विषय नव्याने समाविष्ट असतात जे आपण मुख्य परीक्षेच्या काळात वाचू शकतो. या पेपरमध्ये १०० प्रश्‍न आणि २०० गुण असतात, 

3.शारीरिक चाचणी : मुख्य परीक्षानंतर साधारणत २ महिन्यांमध्ये निकाल लागतो व एका जागेसाठी ४ उमेदवार या प्रमाणात विद्यार्थी शारीरिक चाचणीसाठी पात्र केले जातात. आयोगाने जाहीर केलेल्या निकषातुसार २०२३ पासून शारीरिक चाचणी ही केवळ गुणात्मक स्वरूपाची केली आहे. १०० पैकी केवळ ७० मार्क्स घेणे आवश्यक आहे व हे गुण अंतिम गुणवत्ता यादीत गृहीत धरले जात नाहीत. शारीरिक चाचणीचा सराव शक्यतो एखाद्या कोचच्या मार्गदनाखाली करावा, सराव करताना आपण काळजीपूर्वक तसेच सातत्याने केला पाहिजे, पुरुषांकरिता निकष - ८०० मीटर धावणे, गोळा फेक , लांब उडी , पुलअप्स महिलांकरिता निकष- २०० मी धावणे, गोळा फेक, तीन कि.मी. चालणे 

4. मुलाखत - परीक्षेचा हा शेवटचा व निर्णायक टप्पा असतो. मुलाखतीसाठी ४० गुण असतात. या टप्प्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी होत असते. आपण कसे बोलतो? विविध विषयांवर आपली काय मते आहेत? सामाजिक प्रश्‍नांची जाण यासह व्यक्तिमत्वाचे विविध पैलू तपासले जातात व त्यानुसार गुण दिले जातात. 

5. अंतिम निकाल- मुलाखत झाल्यानंतर लगेचच अंतिम निकाल जाहीर केला जातो. अंतिम निकाल हा मुख्य परीक्षा व मुलाखत या दोन टप्प्यावरील गुणाची एकत्रित बेरीज करून तयार केला जातो.


Tuesday, August 8, 2023

वक्तृत्व एक कला...

आपल्या संभाषण कौशल्यात जर बदल आणायचा असेल तर तुमच्या सर्वात आवडत्या वक्त्याचे नाव आठवा. ज्या वक्त्याचे ऐकल्यानंतर आपल्याला त्याने मांडलेला मुद्दा लगेच समजतो. त्याच्या भाषाशैलीची, शब्दांची आपल्याला एक आगळीच ओढ असते. त्याची देहबोली, त्याचा पेहराव, एकंदरीत त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचादेखील आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव असल्याचे आपल्या लक्षात येईल. आपल्यालासुद्धा त्याच्यासारखे उत्तमपणे बोलता यावे हीच आपली एक माफक अपेक्षा असते. 

स्वातंत्र्यपूर्व काळातील वक्त्यांच्या भाषाशैलीत संस्कृत सुभाषितांचा उल्लेख असायचा म्हणूनच त्या काळात पाठांतरालासुद्धा तितकेच महत्त्व होते, पण जसजसे जग बदलत गेले त्या पद्धतीने सहज आणि ओघवते बोललेले लोकांना आवडू लागले. 

उत्तम वक्‍ता होण्यासाठी जागतिक वक्‍त्यांचा केलेला अभ्यास खूप कामी येतो. प्रसिद्ध व्यक्तींची आत्मचरित्र वाचणे, इंटरनेट वरील व्हिडीओ पाहणे गरजेचे आहे. 

जेणेकरून त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे विचार मांडण्याची पद्धती यांची सुसंगती आपल्याला घालता येईल. एखादा ठळक मुद्दा जर तुम्हाला प्रकर्षाने मांडायचाच असेल तर त्यासोबतच त्या विषयाशी निगडित असणारे अवांतर ज्ञानसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. म्हणून वाचनाला वक्‍तृत्वात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. निर्भयपणे, आकाराने लहान लहान वाक्‍यांतून अगदी समर्पकपणेदेखील आपले मुद्दे मांडता येतात. जाणकार वक्‍ते श्रोत्यांना ज्या भाषेत समजेल त्या माध्यमांतून अर्थात कधी व्याख्याने देऊन, कधी आध्यात्मिक भजन कीर्तनांतून, तर कधी विनोदी शैलीनेदेखील आपला मुद्दा मांडतात. अनेक क्रांतिकारक आणि समाजसुधारक हे उत्तम वक्‍ते होते आणि या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाची स्वत:ची अशी आगळीवेगळी एक शैली होती. त्यापैकी काही नावे म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इत्यादी. मराठी साहित्यातदेखील पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, आचार्य अत्रे या सर्वांच्या मांडणीतला वेगळेपणा आपल्याला प्रकर्षाने जाणवतो. नुसतं अनुसरण न करता आपलं वेगळेपण जपत श्रोत्यांसमोर आपली प्रतिमा निर्माण करू शकता. 

सर्वसाधारण जनतेचे प्रश्‍न जाणून घेताना त्यांच्याशी संवाद करताना साध्या भाषेत संवाद साधायचे आणि विद्वान लोकांशी चर्चा करत असताना ते आपल्या विद्वतेने समोरच्याला आपला मुद्दा पटवून द्यायचे कौशल्य एका सर्वोत्तम वक्त्याला चांगलेच अवगत असते. विषयास अनुसरून देहबोलीचा वापर करून मुद्दा मांडता यायला पाहिजे. काहींना आपला मुद्दा प्रश्‍न विचारून मांडायला आवडतो. ज्यामुळे मुद्दा एकतर्फी भाषण न राहता एकमेकांशी केलेला संवाद वाटू लागतो. 

Sunday, August 6, 2023

(सेल्फ मोटिवेशन) हार मानण्यापूर्वी पुन्हा एकदा करा विचार


अनेकांचा आत्मविश्वास खूप कमकुवत असतो.  ते काहीही नवीन करण्याचा प्रयत्न करण्यास कचरतात, खूप लवकर हार मानतात किंवा स्वत: ला कमकुवत समजतात. अशी विचारसरणी प्रगतीच्या आड येते, त्यामुळे त्यावर मात करण्याची गरज आहे. 

आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग येतात, जेव्हा आपण पूर्णपणे निराश होतो, तेव्हा आपल्या मनात एक आवाज उठतो, 'मला जमणार नाही' किंवा हे काम माझ्या हातून जमणार नाही. जेव्हा जेव्हा तुमच्या मनात अशा भावना येतात तेव्हा पुन्हा एकदा विचार करा आणि या सूचनांचे अनुसरण करा

नेहमी विचार करा की आणखी बरेच काही शिकायचे आहे: जेव्हा तुम्ही एखादा नवीन प्रकल्प हाती घेता, नवीन विषय किंवा नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करता, तेव्हा कधीकधी असे वाटते की हे काम खूप कठीण आहे.ते काम पुढे करणे कदाचित शक्य होणार नाही.अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मनात दृढ विश्वास ठेवून विचार केला पाहिजे की पुढे जाण्यासाठी आणि काहीतरी करण्यासाठी मला आणखी शिकण्याची आवश्यकता आहे. अनुभव घेण्याची आणि शिकण्याची उर्मी आणि तळमळ मनात निर्माण होईल, तेव्हा तुमच्या मनातील निराशा दूर होईल.

आवश्यकतेनुसार नवीन रणनीती तयार करा: नवीन व्यवसाय सुरू करताना किंवा नवीन नोकरी सुरू करताना अनेक अडचणी समोर येतात. तुम्ही प्रत्येक पावलावर गडबडायला लागता किंवा पराभूत व्हायला लागता. नोकरीचे लक्ष्य वेळेवर पूर्ण होत नाही किंवा व्यवसायात अपेक्षित नफा मिळत नाही. अशा परिस्थितीत अनेक वेळा तुम्ही हार मानता आणि नोकरी बदलण्याचा विचार सुरू करता. जेव्हा हे घडते तेव्हा स्वत: ला एक किंवा दोन दिवस विश्रांती द्या.  चांगले विचार करा आणि सर्व गोष्टींचा नवीन पद्धतीने विचार करा. काही अनुभवी आणि यशस्वी शुभचिंतकांशी बोला.  मग एक नवीन रणनीती बनवा आणि ती परिश्रमपूर्वक अंमलात आणा. 

नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार रहा: काही लोक लाजाळू, भयभीत आणि सुरक्षित क्षेत्रात राहणारे असतात. कोणतेही मोठे काम त्यांच्यावर सोपवले तर ते घाबरतात.  ते काम अधिक नफा किंवा भविष्यातील प्रगतीसाठी उपयुक्त असले तरी ते नाकारतात. याचे कारण म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव.  असे लोक आपले संपूर्ण आयुष्य एका चाकोरीबद्ध दिनचर्येत पूर्ण करण्यात आणि मर्यादित कमाईच करण्यात घालवतात.

तुमच्यासमोर कोणतीही संधी आली किंवा काही मोठे काम करण्याची संधी मिळाली तर ती अजिबात सोडू नका. काहीतरी नवीन शिकण्याची संधी म्हणून लगेच स्वीकारा. संधी पुन्हा पुन्हा दार ठोठावत नाहीत.  सर्वात जास्त असे होईल? तुम्ही अयशस्वी व्हाल, तरीही तुम्हाला अनुभव नक्कीच मिळेल.

चुकांमधून शिकत राहा. आत्म-शंका ही विचार करण्याची अत्यंत चुकीची पद्धत आहे.  ते तुमचे पाय बंधनात अडकवते. ज्यांचा आपल्या प्रतिभेवर, क्षमतेवर आणि मेहनतीवर विश्वास नसतो, ते कधीही पुढे जाऊ शकत नाहीत. आत्महिनता आणि दुर्बल इच्छाशक्तीमुळे, त्यांना भीती वाटते की मी चूक करेन, मी पुन्हा पुन्हा चुका करू शकेन. तुम्हीही अशा मानसिकतेतून जात असाल तर लक्षात ठेवा, चुका हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. आपण चुकांमधून शिकतो आणि समजूतदार बनतो. जितक्या चुका तितके शहाणपण अधिक. चुकांमधून येणाऱ्या शहाणपणा इतकं दुसरं कोणीही तुम्हाला शहाणे करू शकत नाही.प्रत्येक व्यक्तीने कोणतीही गोष्ट करू द्या, त्यातून फक्त दोनच कळतात एक म्हणजे योग्य आणि दुसरं अयोग्य. चूक की बरोबर. आपण काहीच केले नाही तर काहीच होणार नाही.  त्यामुळे चुकांमधून शिका पण पुढे जाणे थांबवू नका.

या गोष्टींकडेही लक्ष द्या : स्वत:वरचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या सूचनांकडेही लक्ष द्या. 

» तुमची सर्वात लहान उपलब्धी साजरी करा. छोट्यात छोटं यश सेलिब्रिट करा. 

» आनंदी होण्यासाठी मोठ्या संधीची वाट पाहू नका.  प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.

» तुमची ताकद तसेच तुमच्या कमकुवतपणाचा  हिशोब ठेवायला शिका.

» स्थिरता हे जडत्वाचे प्रतीक आहे.  बदल हा निसर्गाचा शाश्वत नियम आहे.  बदल प्रत्येकासाठी, काळ, निसर्ग आणि मानवासाठी आवश्यक आहे.म्हणूनच नवीन परिस्थिती किंवा गोष्टींपासून दूर पळण्याची प्रवृत्ती बाळगू नका.

" स्वत: वर प्रेम करा.  स्वतःला कोणापेक्षा कमी समजू नका.  तुम्ही देवाची सर्वोत्तम निर्मिती आहात, ज्याची काळजी घेण्याची आणि संवर्धन करण्याची तुमची स्वतःची जबाबदारी आहे.

» तुमच्या उणीवा आणि चुकांसाठी स्वतःला माफ करायला शिका.

» काही वेळा नकारात्मक भावनांवर वर्चस्व गाजवणे हे सामान्य आहे आणि प्रत्येकजण वाईट काळातून जातो, त्यामुळे त्याचा तुम्हाला त्रास होऊ देऊ नका.

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली