Tuesday, September 8, 2020

इमॅजिनेशनसोबत हवं नॉलेज


तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर फक्त तुमच्याकडे नॉलेज असून चालणार नाही. यशस्वी होण्यासाठी व्यक्तीजवळ इमॅजिन करण्याची क्षमताही असावी लागते. जर तुमच्याजवळ कल्पनाशीलतेचा (इमॅजिणेशन) अभाव असेल तर फक्त कोऱ्या ज्ञानाच्या जीवावर तुम्ही काहीच मिळवू शकणार नाही. शास्त्रज्ञ आइन्स्टिन कल्पनाशीलतेला ज्ञानापेक्षा अधिक महत्त्वाचे मानत होते. ते प्रायोगिकरित्या काहीही सिद्ध करण्याअगोदर ते पहिल्यांदा कागदावर उतरवून काढत. अशा प्रकारे शास्त्रज्ञ एडिसन यांनी विद्युत बल्ब जगासमोर आणण्यापुर्वी त्याचे कच्चे रेखाटन आपल्या वहीत रेखाटले होते. ते अजिबात 'हवेत गोळ्या मारत' नव्हते. त्यांनी पहिल्यांदा मनातल्या मनात कल्पना केली होती की, विद्युत बल्ब कसा दिसायला हवा. यानंतरच त्यांनी आपल्या कल्पनेला मूर्त स्वरूप द्यायला सुरुवात केली. 

वास्तविक एखादी व्यक्ती यश मिळवण्याच्या दिशेने काम करायला लागते, तेव्हा सगळ्यात अगोदर त्यांचं अंतिम कच्चं चित्र त्याच्या डोक्यात तयार व्हायला हवं. ज्या चांगल्या प्रकारे यशाचं चित्र डोक्यात तयार होईल, तितक्या लवकर तुमच्या यशाला मूर्त स्वरूप प्राप्त होईल. जर तुम्ही आपल्या डोक्यात यश आणि त्याच्या संभावित मार्गाचे चित्र बनवले नसेल तर तुम्ही फक्त भरकटत जाल आणि अंतिमतः तुमच्या हाताला काहीच लागणार नाही. तुम्ही म्हणाल, मन ज्याचा विचार करतं, तसं होणं शक्य नाही. पण हेही खरं आहे की, कित्येकदा आपण आपल्या विचारांच्या मागे जायला लागतो, तसतसे यश मिळायला लागते. यामुळेच जगातले बहुतांश सक्सेस गुरू तुम्हाला 'पॉजिटीव्ह थिंकिंग'चा (सकारात्मक राहण्याचा)  सल्ला देतात. 

पॉजिटीव्ह विचार केल्याने तुम्ही तुमच्या यशाच्या मार्गाचा विचार करता,अडथळ्यांचा नाही. ज्यावेळी तुम्ही मनात यशोशिखरावर पोहचण्याचे प्लानिंग करता ,त्यावेळी त्या दिशेने वाटचाल करणं सोपं जातं. यासाठी तुम्हाला नॉलेजही हवं. तुम्ही तुमच्या नॉलेजसोबत अंतर्मनाच्या प्रेरणेशी जोडले जाता, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये एक शक्ती असल्याची जाणीव होते आणि तुम्ही तुमच्या यशोशिखराच्या दिशेने वाटचाल करू लागता. या दरम्यान तुम्हाला अनेक अडचणी येतात, पण तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर समस्यांची सोडवणूक करता. गोष्ट मग अभ्यासाची असेल किंवा नोकरीची!  अथवा पैसे कमावण्याची! प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मन आणि डोकं या दोघांचंही ऐका आणि  मगच तुम्ही संतुलित निर्णय घ्या. 

डोकं नॉलेजच्या गोष्टी करेल आणि मन इमॅजिनेशनच्या! आता कशाप्रकारे दोन्ही गोष्टी समजून घेऊन योग्य निर्णय घ्यायचा,हे  तुमच्यावर अवलंबून आहे.निर्णय घेताना तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे. जी माणसं या जगात यशस्वी झाली आहेत, ती माणसंही तुमच्यासारखीच सर्वसामान्य होती. पण त्यांनी यशाच्या अगोदरच यशाच्या बाबतीत चिंतन केलं होतं.त्यामुळेच ते यशस्वी झाले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Wednesday, September 2, 2020

व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर कामाचे मूल्य (Value) आणि शुल्क (Price) यातला फरक ओळखा

 


एका जहाजामध्ये काहीतरी बिघाड होतो. यामुळे जहाज समुद्रात नेणे अशक्य होऊन बसते. जहाजाचे कर्मचारी सगळं जहाज तपासून पाहतात, पण त्यांना दोष काही सापडत नाही. अथक प्रयत्न करूनही जेव्हा त्यांना अपयशच येतं तेव्हा ते जहाज बांधणी मधील तज्ञ व्यक्ती ला बोलावतात. तो इंजिनियर येतो संपूर्ण तपासणी करतो... जहाजाच्या एका पॅनल मधील स्क्रू ढिल्ला झालेला असतो, त्यामुळे संपूर्ण बॉडी मध्ये प्रॉब्लेम तयार झालेला असतो. इंजिनियर तो स्क्रू पुन्हा पक्का बसवतो आणि जहाज पूर्ववत होते. 

जाताजाता तो इंजिनियर त्याचे बिल जहाज कंपनीकडे सुपूर्द देतो आणि निघून जातो. ते बिल असतं दहा हजार रुपयांचे. एक स्क्रू पक्का बसवण्यासाठी दहा हजार रुपये कंपनीला जरा जास्त वाटतात म्हणून ते त्यांच्या एका कर्मचाऱ्याला त्या इंजिनियर कडे बिल दुरुस्त करायला पाठवतात. कर्मचारी जातो आणि इंजिनियर ला एक स्क्रू पक्का बसवण्याचे इतके बिल होऊ शकत नाही, बिल कमी करा असे सांगतो. 

इंजिनियर त्या कर्मचाऱ्याच्या हातात नवीन बिल सोपवतो. त्यात लिहिलेले असते स्क्रू पक्का बसवण्याचे शुल्क रु. १/- आणि कोणता स्क्रू ढिल्ला आहे हे शोधण्याचे मूल्य ९,९९९/-  यावरून तुम्हाला मूल्य आणि शुल्क (किंमत) यातला फरक लक्षात आला असेल अशी अपेक्षा करतो. मी एखाद्याला कन्सल्टिंग करतो तेव्हा त्यासाठी माझी  कन्सल्टिंग आकारतो. त्यावेळी सुद्धा हि समस्या जाणवते. लोकांना वाटत कि दोन तास बोलायचे एवढे शुल्क कशाला. पण ते शुल्क नसते तर मूल्य असते माझ्या ज्ञानाचे, बुद्धीचे आणि वेळेचे. लोकांना समजावून सांगण्याच्या फंद्यात मी पडत नाही, कालांतराने व्यवसायात समस्या जाणवायला लागल्या कि ते पुन्हा माझ्याकडेच येणार असतात. ते ग्राहक म्हणून आपल्या फी ला शुल्क म्हणून पाहत असतात आणि आपण व्यवसायिक म्हणून आपले मूल्य ठरवत असतो. 

असो... तुम्हाला तुमच्या कामाचे मूल्य ओळखता आले पाहिजे. कित्येक ठिकाणी तुम्ही पहिले असेल कि पारंपरिक कला असलेल्या लोकांकडून हाताने बनविलेल्या वस्तू अतिशय कमी किमतीत घेतल्या जातात. त्या उत्पादकांना आपल्याकडून पन्नास रुपयांना घेतलेली कलाकुसर बाहेर मार्केटमधे हजार रुपयांना विकली जाते हे माहीतही नसते. ते मिळेल तेवढे पैसे घेतात याचे कारण त्यांना त्यांच्या कौशल्याचे मूल्य माहित नसते. त्यांना फक्त त्यांच्या कामाची किंमत माहित असते. एखादा कलाकुसरीचा टेबल हजार रुपयांना मिळत असेल तर तोच टेबल एखाद्या मोठ्या ब्रॅण्डच्या नावाखाली लाख रुपयाला सुद्धा विकला जाऊ शकतो. कारण त्या ब्रँड ने आपल्या वस्तूचे मूल्य ठरवलेले असते किंमत नाही. रोल्स रॉयस कार मध्ये सात आठ कोटी खर्च करावेत असं काही नाही पण त्या ब्रँड चे मूल्यच इतके मोठे हे कि ती किंमतही तुम्हाला त्या गाडीसमोर फिकी वाटते. एखादी पेंटिंग  करोडो रुपयांना विकली जाते याचे कारण तिचे मूल्य आहे, किंमत नाही. कामाचे मूल्य मिळणं हि तशी सोपी गोष्ट नाही. यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागते, इतरांपेक्षा वरचढ व्हावे लागते, स्वतःचा ब्रँड बनवावा लागतो, इतरांकडे नसेल असे ज्ञान कौशल्य मिळवावे लागते... हे ज्यांच्यासाठी अवघड आहे त्यांना तसंही यश कमीच मिळतं. त्यामुळे यात तडजोड होऊ शकत नाही  

कष्टाची किंमत मिळते, कौशल्याचे मूल्य मिळते. म्हणून कौशल्य आत्मसात करा. ज्या क्षेत्रात असाल त्यातले तज्ञ व्हा. अगदी बूट पॉलीश जरी करत असाल तरी त्यातले कौशल्य आत्मसात करा. लोक पॉलिश साठी दोन नाही दोनशे रुपये सुद्धा देतील. 

 आपल्या कामाचे मूल्य ओळखा, किंमत तर सगळेच करतात. तुम्हाला तुमच्या कामाचा परतावा शुल्क म्हणून नाही तर मूल्य म्हणून ज्यावेळी मिळायला लागतो त्यावेळी तुमची यशाकडे भक्कम वाटचाल सुरु झालेली असते हे लक्षात घ्या. 


Tuesday, September 1, 2020

पहाटेची अमर्याद ताकद


'तुम्ही सकाळी किती वाजता उठता?' हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती. पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला.पण तो हार मानणारा नव्हता, यातून बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं?

“हेल, तु सकाळी लवकर उठ! बाकी सगळं आपोआप होईल”या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते, काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली, आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं!

पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का?

इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्नावर हेल ने एक कोडवर्ड सांगितलाय.

‘SAVERS’- ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत.

१) Silence – (ध्यान)- शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान!

- स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान!

- मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान!

- मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!

- माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान!

- अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान! 

२) Affirmations – (सकरात्मक स्वयंसूचना) - अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद! - स्वतः स्वतःला सुचना देणं,

- प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!

- येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसूचना!

- स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात.

- अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो.

- एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे? 

- वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!... 

३) Visualize – (चांगल्या कल्पना मनात घोळवणे.)

तीव्र इच्छा पुर्ण झाली आहे, अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटला वर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिज्वलायजेशन!

- कल्पनाशक्ती ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे.

- कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं.

- दररोज आपण आपली ध्येयं पूर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे.

पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो.

- ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे. 

- मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो.

- प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, “यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!” 

४) Exercise – (व्यायाम) - शरीरातून आळसाला पळवून  लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम! शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा! व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जे*पहाटेची अमर्याद ताकद.

- व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त बाबीकडे वळते, आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.

- वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.  

- तो कशावरच एकाग्र होवू शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होवू शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.

- ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,प्राणायाम करा.  शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.

५) Reading – (वाचन)- पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.

- पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.

- वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.

६) Scribing – (लिहिणे.)

- लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.

- लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.

- लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.

- संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.

- लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे.लिहिल्याने विचार पक्के होतात.

- सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं,

- एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत.

- मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.

- ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,

-  रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत, आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं.

- लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!

- जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.

- अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.

ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे. वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या आहेत.? 

आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे...तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे.

कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो...आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत.. तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू.... अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये.....

वेळ आहे स्वतःवर काम करण्याची....स्वतःसाठी जगण्याची.....आलेल्या परिस्थिती चा फायदा करून घेण्याचा.. काळजी घ्यायची आहे,काळजी करायची नाही. ला वळण न दिल्यास ती अतिरिक्त बाबीकडे वळते, आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.

- वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.  

- तो कशावरच एकाग्र होवू शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होवू शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.

- ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,प्राणायाम करा.  शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.

५) Reading – (वाचन)

- पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.

- पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.

- वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.

६) Scribing – (लिहिणे.)

- लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.

- लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.

- लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.

- संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.

- लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे.लिहिल्याने विचार पक्के होतात.

- सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं,

- एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत.

- मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.

- ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,

-  रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत, आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं.

- लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!

- जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.

- अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.

ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे. वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या आहेत.? 

आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे...तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे.

कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो...आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत..

तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू....

अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये.....

वेळ आहे स्वतःवर काम करण्याची....स्वतःसाठी जगण्याची.....आलेल्या परिस्थिती चा फायदा करून घेण्याचा.. काळजी घ्यायची आहे,काळजी करायची नाही.

ऊगाच श्रीमंत झालो....


जॅकी श्रॉफ त्यांच्या आई बाबतीत नेहमीच हळहळ व्यक्त करतात. ते म्हणतात , आम्ही गरीब होतो तेंव्हा चाळीच्या एका खोलीत संपूर्ण कुटुंब सामावून जायचे. रात्री झोपेत कुणाला खोकला लागला तरी ,आई उठायची आणि छातीला बाम लावायची. कालांतराने श्रीमंती आली , मोठं घर घेतले आणि प्रत्येकासाठी वेगवेगळ्या रूम घेतल्या गेल्या.

एका रात्री ,आईला अचानक हृदयवीकाराचा झटका आला , ती तड्फडली अन ओरडली पण मोठ्या घराच्या मोठ्या भींतीने एक वेगळीच भिंत तयार करून ठेवली आणि आमची आई नजरे आड झाली. कधी कधी वाटतं, उगाच झालो श्रीमंत आणि ह्याच श्रीमंती मुळे आई गेली. मित्रांनो अन मैत्रिणींनो , आपल्या माणसाच्या म्हणजेच त्यातल्या त्यात उतार वयातील आपल्या आई -वडिलांसोबत रहा. *लहानपणी तुमची पाळण्यात नुसती हालचाल झाली तरी उठून बसणाऱ्या पालकांना जेंव्हा तुमची गरज असेल तेंव्हा तुम्ही नसाल तर त्याहून मोठे दुर्भाग्य कुठले नसेल. त्यांनी तुमच्यासाठी जेवढे केले आहे , त्याच्या १०% जरी तुम्ही केले तरी खुप आहे पण त्यांची साथ सोडू नका....*

(जॅकी श्रॉफ यांचे मनोगत.)

डिडरोट इफेक्ट


तुमच्या माहितीतील असा एखादा सिद्धांत (थेअरी) सांगू शकता का जो किंवा ज्याचे परिणाम खूप भयानक होते / आहेत? ही १७६५ सालची गोष्ट. डेनिस डिडरोट आतापर्यंत ५२ वर्षाचा झाला होता. त्याने खूप जास्त पुस्तके वाचलेली होती आणि जणू त्याची लायब्ररीच त्याच्याकडे होती. तरी त्याने त्याचे पूर्ण आयुष्य गरिबीत काढलेले होते. त्याच्या मुलीच्या लग्नासाठीसुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते.

एकेदिवशी रशियाची त्यावेळेची राणी कँथरीनला डिडरोटच्या ह्या गरिबीबद्दल माहित झाले. तिने डिडरोटला त्याच्याकडील लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 GBP, म्हणजेच ५० हजार डॉलर्स किंवा आताचे जवळपास साडेतीन करोड रुपये डिडरोटला देऊ केले. आणि डेनिस डिडरोट एका दिवसांत खूप श्रीमंत झाला. त्याने लगेच त्या पैशातून "स्कार्लेट रॉब" म्हणजे एक उच्च्प्रतीचा सदरा विकत घेतला जो अतिशय महागडा होता. हा सदरा वापरत असतांना त्याला अचानक जाणवले की आपण घालतोय अतिशय उच्चप्रतीचा सदरा आणि आपल्या घरात त्याच उच्चप्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्याने हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या, किचन रूममधल्या वस्तू बदलल्या, फर्निचर बदलले आणि अशा सगळ्या नवीन वस्तू विकत घेतल्या ज्यामुळे आता पूर्ण घर आणि सदरा एकमेकांना शोभून दिसत होते.
परंतु हे सगळे करण्यामध्ये तो पूर्णतः कंगाल झाला आणि त्याच्या नावावर असलेले कर्ज जास्तच वाढून गेले. त्याने हे सगळे दुखः कष्टाने सहन केले आणि हे सगळे आपल्या एका निबंधांत नमूद करून ठेवले. ह्याला मानसशास्त्रात "डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)" म्हणतात. मोठ्या कंपन्या, विक्रेते, डेव्हलपर्स ह्या इफेक्टचा वापर छुप्या पद्धतीने करतात.
तुम्ही ३०००० हजाराचा मोबाईल घेणार. मग तुम्हाला काहीतरी कमी वाटेल मग तुम्ही अजून ५०० रुपयाचा गोरील्ला ग्लास लावणार. ५००-६०० रुपायचे महिन्याला कव्हर बदलणार. जिथे ५०० रुपयाचा हेडफोन कामी आला असता तिथे ३००० चा हेडफोन घेणार कारण तो मोबाईलला जास्त शोभून दिसेल. एखादा निळ्या रंगाचा मस्त शर्ट घेतला की त्याला मेचींग असलेले घड्याळ, किंवा पँट घेणार. घरी मस्त मोठा टिव्ही आणला की चांगला टेबल आणणार, त्याला टाटा स्काय लावणार, HD वाहिन्या सुरु करणार. रंग चांगला लावला की खिडकीला परदे लावणार, सजावट करणार.
डिडरोट इफेक्ट एका वाक्यात थोडक्यात सांगायचा झाला म्हणजे : "एक नवीन वस्तू विकत घेतली असता तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपोआप कमी होतो आणि तो वाढविण्यासाठी आपल्या हातून नकळतपणे जास्त खर्च होतो."
तुम्हीच पहा, सगळे विक्रेते छुप्या पद्धतीने डिडरोट इफेक्टचा वापर करतात. एक साधा चहा वाला तुम्हाला चहासोबत सिगारेट देऊ का विचारतो? SIM विकणारा ३ किंवा ४ महिन्याचे packs टाकून द्यायचे म्हणतो, एक laptop विकत घेतांना त्यासोबत २-३ हजाराचा antivirus टाकून मिळतो. लिंबू, आद्रक, टमाटे घेतल्यावर तुम्हाला म्हटले जाते "आहे मिरची पण घ्या की!!". भांडे घेतल्यावर त्याच्यावर ५० रुपयात नाव कोरून मिळते, झाडं विकत घेतली की १०० रुपयाला त्याच खत मिळते. अशी असंख्य उदाहरणे आहेत.
आपण घेतो एक वस्तू आणि दुसऱ्या वस्तू आपोआप घ्यावेसे वाटतात भले त्यांची गरज आपल्याला नको. आणि अशा पद्धतीने आपण एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारसे महत्वाच्या नसणाऱ्या वस्तू त्या पण गरज नसतांना घेऊन टाकतो. आणि आपल्याला कळतसुद्धा नाही. ह्याला "spiraling consumption" म्हणतात म्हणजे एकामुळे दुसऱ्या अनेक गोष्टी गरजेचे वाटणे आणी विकत घेतल्या जाणे.
लक्षात ठेवा, हा "डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)"!! ही मानवी मनाची वागणूक आहे, ह्युमन टेन्नडन्सी!! आणि ह्याला थांबवले जाऊ शकते. ह्याचे परिणाम भयानक आहेत का?? मी सांगेल जास्त भयानक आहेत. कारण परिणाम उघड्या डोळ्यांनी नाही दिसत. आपण नकळतपणे अनावश्यक खर्च करतच जातो आणि खूप उशिरा लक्षात येत हे सगळे. माणसाला खर्च करण्याची भीती वाटत नाही. त्रास होतो तो हिशोब न लागण्याचा!! - व.पु.काळे
तुम्हीच स्वतःला प्रश्न विचारायचा. "मला ह्या वस्तूची खरच गरज आहे का?" उत्तर हो आले तर आहे त्या किमतीत न घेता रिसनेबल किमतीत वस्तू शोधावी.
वस्तूंची उपयोगिता किती त्यानुसार त्यांना विकत घ्यायचे, ना की स्वतःचे ते किती स्टेटस वाढवतील त्यामुळे. समोरच्याने दुसरी वस्तू दाखवली तरी भान विसरायचे नाही. लक्षात ठेवायचे की, "वस्तू मस्त, भारी वाटली तरी तिचा तुमच्या आनंदाशी आणि उपयोगितेशी काडीचा संबंध नाही." आनंद वाटत असला तरी तो क्षणिक असतो. कालांतराने आनंद जातो आणि पैसेसुद्धा!!
"डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)"!!
माहिती संदर्भ :
Understanding the Diderot Effect (and How To Overcome It) (Source - Quara)