Thursday, July 23, 2020

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणातील १० नियम

---------------------------------------------
 नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.
 नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.
नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पडल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .
नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.
 नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकीपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.

Monday, July 13, 2020

इतरांपेक्षा वेगळे करा

तुमच्या भविष्याविषयी बोलण्याआधी मला काही काळ भूतकाळात डोकवायला आवडेल. १९१८ च्या प्रारंभी नौदलात सहाय्यक सचिव असणारा ३६ वर्षांचा तरुण परदेशी निघाला होता. युरोपियन युद्धासाठी अमेरिकेच्या नवख्या सैनिकांना सज्ज करण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली होती. दुसरीकडे अवघ्या ३0 वर्षांचा, शोधप्रबंध सादर करण्याची स्वप्नं रंगवणारा, युद्धामुळे चिरडला गेलेला सुधारणावादी कवी- अध्यापक स्वत:मध्ये दंग होता. पण शिक्षक आणि बँकेतला कर्मचारी अशा दोन परस्परविरोधी नोकर्‍यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न तो करत होता.

Wednesday, July 8, 2020

मिस्टर आणि मिसेस लेलँड स्टॅनफोर्ड

 कधी माणसाची ओळख करण्यात आपण किती मोठी चूक करतो, याचे एक मोठे उदाहरण पहा. अमेरिकेतील जगप्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापीठाच्या प्रेसिडेंटना भेटण्यासाठी म्हणून एक वृद्ध जोडपे अपॉईंटमेंट न घेता भेटायला आले. त्या जोडप्याचा वेष नुसताच साधा नव्हता, तर गबाळाही होता. म्हाताऱ्याबाईंनी घातलेला फॉक अगदी साधा, चुरगळलेला आणि थोडासा मळलेला, तर म्हाताऱ्याबुवांनी घातलेला सूटही घरी शिवलेला, ढगळ, गबाळा आणि इस्त्री न केलेला होता. प्रेसिडेंटच्या केबिनबाहेर पॉश काऊंटरवर बसलेल्या सेक्रेटरीकडे ते जोडपे आले. 'आम्हाला प्रेसिडेन्ट साहेबांची फक्त दहा मिनिटेच भेट हवी आहे! मिळेल का?' त्या आजीबाईंनी नम्रपणे विचारले.

Monday, July 6, 2020

रागावर ताबा ठेवा

'राग हा माणसाचा शत्रू आहे' हा सुविचार आपण अगदी
लहानपणापासून शाळेत फळ्यावर लिहीत आलेलो आहोत. हा शत्रू सगळ्यात जास्त नुकसान करणारा असतो, हे ही आपल्याला माहीत असते. कुठल्याही मोठ्या आर्थिक नुकसानापेक्षा, या रागामुळेच अनेक नाती, अनेक संबंध अगदी कायमचे नष्ट होतात. अविचाराच्या हातात हात घालून येणारा हा शत्रू माणसाची सद्सद विवेक बुद्धी गहाण ठेवण्यास भाग
पाडतो. मनासह शरीरावरही वाईट परिणाम करणारा हा राग का येतो माणसाला इतका? 'कळतं पण वळत नाही' असेही घडते, पण राग काही शांत होत नाही माणसाचा. अपयश, काही गोष्टी कारणीभूत असतात